श्री गुरू गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम 'देहधारी गुरू' होत. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ गुरू ग्रंथ साहिबचे संकलन आणि लिखाण केले.
गुरू गोविंद सिंह यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की गुरू ग्रंथ साहिब लाच आपला गुरू माना). नांदेड शहरात गुरू गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. यामुळे नांदेडला शिखांची काशी असे म्हणले जाते. आजही पंजाबसह अनेक ठिकाणाहून शीख लोक नांदेडला गुरूद्वाऱ्यात भेटी देण्याकरीता येतात.
गुरू गोविंद सिंग यांनी पवित्र धर्मग्रंथ (ग्रंथ) गुरू ग्रंथ साहिब पूर्ण केला आणि त्यांना गुरू म्हणून पवित्र केले. बचित्तर नाटक हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्याच्या जीवनाविषयी माहितीचा हा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. तो दशम ग्रंथाचा एक भाग आहे. दशम ग्रंथ (ग्रंथ), हे गुरू गोविंद सिंग यांच्या कृतींच्या संकलनाचे नाव आहे.