आधुनिक महाराष्ट्राचे महिपती श्री दासगणू महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज (१८६८-१९६२) हे मराठी संत, कवी, कीर्तनकार होते. दास गणू महाराज यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना' आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणून ओळखतात. त्यांचा जन्म पौष शु. एकादशी ६ जानेवारी १८६८ रोजी अकोळनेर, ता. जि अहमदनगर या गावी झाला. १८९३ मध्ये ते पोलीस खात्यात भरती झाले आणि १९०४ पर्यत नोकरी केली. महाराज पोलीसखात्यात नोकरीला असले तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. या दरम्यानच त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले त्यांचे पहिले कीर्तन १८९७ साली जामखेडच्या विठ्ठल मंदिरात झाले. श्री साईनाथ स्तवनमंजिरी या स्तोत्राची निर्मिती महाराजांनी ९ सप्टेंबर १९१८ रोजी मध्य प्रदेशातील श्री माहेश्वर या क्षेत्री श्री साईबाबांचे महानिर्वाणाच्या अगोदर ३७ दिवसांपूर्वी केली. साईबाबा संस्थानची स्थापना: सन १९२२ झाली आणि पहिले अध्यक्ष म्हणून दासगणु महारांजाची निवड केली तेथुन पुढे १९४५ पर्यत त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यांचे महानिर्वाण, श्रीज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथीला (कार्तिक वद्य १३, १८८३) २६ नोव्हेंबर १९६२ मध्ये पंढरपुरात झाले. त्यांचे समाधी स्थळ: मु. पो. गोरटे ता. उमरी जि. नांदेड येथे आहे.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |